GANPATIPULE

TYPE : GANESHMANDIR

DISTRICT : RATNAGIRI

रत्नागिरी जिल्ह्यावर परमेश्वराचा वरदहस्त आहे. गणपतीपुळे, पावस, आडिवरे, मार्लेश्वर, कसबा, अशी अनेक तीर्थक्षेत्रे रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. सा-या बाजूंनी रत्नागिरी जिल्हा समृद्ध आहे. अगदी तिथल्या माणसांपासून ते निसर्गापर्यंत सारं काही आपलंसं करणारे आहे. कोकणातली माणसं तर त्यांच्या अगत्यासाठी प्रसिद्ध आहेतच, पण निसर्गाच्या कुशीत वसलेलं कोकणदेखील आपल्याला कायमच खुणावत असतं.गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. स्वयंभू गणेशाचे हे स्थान अतिशय नयनरम्य व मनाला शांतता देणारे आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्यअसे की हे मंदिर समुद्रकिनारी आहे आणि भरतीच्या वेळी मंदिराच्या भिंतीपर्यंत पाणी येते. देवळासमोरील स्वच्छ सुंदर समुद्रकिनारा मनमोहक आहे. किनारा आणि मंदिर यातील अंतर फार तर फार पाच मिनिटे असेल. मंदिरातून बाहेर पडल्यावर आपण किना-यावरच उतरतो. ... मंदिरासमोर १२ किमी लांबीचा समुद्रकिनारा आहे. एका बाजूला समुद्र म्हणजे वाळू तर दुस-या बाजूला खडकाळ प्रदेश असा हा अनोखा संयोग आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील बाप्पाला आवडणा-या दुर्वा मात्र तिथे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत.हे प्रथम झोपडीवजा मंदिर होते . शिवाजी महाराजांनी येथे पक्के बांधकाम करून घेतले व पेशव्यांनी त्यात बरीच सुधारणा केली. लोभासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी हा अवतार झाला होता असे येथील पुरोहित सांगतात. येथील ४०० वर्षांची गणपतीची मूर्ती स्वयंभू असुन मंदिर पश्चिमाभिमुख आहे. फेब्रुवारी, नोव्हेंबर महिन्यात सायंकाळी सूर्याची किरणे मूर्तीवर पडतात. सह्याद्री पर्वतातील नैसर्गिक मूर्ती आणि त्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती स्वयंभू असल्याने त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. १ कि. मी. लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय दिसतो. येथे यायला रत्नागिरीहून एस.टी.ची सुविधा आहे .येथील अनेक कुटुंबात एक दिवस राहण्याची व जेवणाची घरगुती सोय आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!