AYODHYA RAMMANDIR

TYPE : RAMMANDIR

DISTRICT : UTTAR PRADESH (AYODHYA)

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हे जगभरातील कोट्यावधी हिंदुचा आस्थेचा विषय आहे. हिंदू धर्मातील धारणेनुसार श्री राम हे श्री विष्णूचा अवतार मानले जातात. प्राचीन भारतीय महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला होता म्हणून अयोध्या हे क्षेत्र राम जन्मभूमी म्हणून ओळखले जाते. १५ व्या शतकात मुघलांनी या रामजन्मभूमीवर हिंदू मंदिर पाडुन बाबरी मशीद बांधली. राम मंदिराची पुनर्निर्मिती करताना या बांधकामाच्या जागेची सपाटी आणि उत्खननात शिवलिंग,मंदिराचे खांब आणि तुटलेल्या मूर्ती सापडल्या. रामाच्या जन्माच्या स्मरणार्थ राम मंदिर बांधल्याने मंदिरातील प्रमुख देवता हे विष्णूचा अवतार असलेल्या रामाचे बालरूप आहे. या बालरूपातील रामाला तुलसीदासांनी रामलल्ला असे संबोधले आहे. १९४९ मध्ये स्थापित केलेल्या रामाच्या मूर्तीला स्थानिक हिंदूंनी रामलल्ला असेच संबोधले आहे. गर्भगृहात देवतेची नवीन मूर्ती स्थापित करण्यात आल्यामुळे १९४९ मधील रामलल्ला मूर्ती यापुढे उत्सव मूर्ती म्हणून वापरली जाईल. राम हा एक प्रमुख हिंदू देवता आहे जो देव विष्णूचा पूर्णावतार मानला जातो. ... हिंदू संस्कृती आणि धर्मात रामाचे खूप महत्त्व आहे. रामामध्ये सोळा आदर्श गुण असल्याचे म्हटले जाते, म्हणून हिंदू रामाला पुरुषोत्तम,विग्रहवान धर्म: आणि आदि पुरुष म्हणून पाहतात. हिंदू महाकाव्य रामायणानुसार रामाचा जन्म अयोध्येत झाला. अयोध्या हिंदूंसाठी सात सर्वात पवित्र शहरांपैकी एक आहे. अयोध्येतील तीन ठिकाणे हिंदूंमध्ये प्रमुख पुण्यक्षेत्र मानली जातात. ती म्हणजे जन्मस्थान, स्वर्गद्वार आणि यज्ञस्थळ. राम मंदिराची मूळ रचना १९८८ मध्ये अहमदाबादच्या सोमपुरा कुटुंबाने तयार केली होती. २०२० मध्ये सोमपुरांनी मूळपेक्षा काही बदल करून हिंदू ग्रंथ, वास्तुशास्त्र आणि शिल्पशास्त्रांनुसार एक नवीन रचना तयार केली. मंदिर २५० फूट रुंद, ३८० फूट लांब आणि १६१ फूट उंच असेल. अयोध्येतील राम मंदिर परिसर हे जगातील तिसरे सर्वात मोठे हिंदू मंदिर आहे. हे मंदिर उत्तर भारतातील नागर शैलीतील हिंदू मंदिराप्रमाणे बांधले गेले आहे. मंदिराची मुख्य रचना तीन मजली उंच व्यासपीठावर बांधली गेली आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी आणि प्रवेशद्वारावर नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे पाच मंडप आहेत. पहिल्या मजल्यावर असलेल्या श्री राम दरबारात पाच दालने आहेत. नागर शैलीतील हे मंडप शिखरांनी सजवलेले आहेत . देवतांच्या मूर्तींनी सजवलेल्या या मंदिरात कोपऱ्यात सूर्य,भगवती,गणेश आणि शिव यांच्यासाठी समर्पित मंदिरे आहेत. उत्तरेकडे व दक्षिणेकडे अन्नपूर्णा आणि हनुमान मंदिर आहे. मंदिरात एकूण ३६६ स्तंभ आहेत. या स्तंभांमध्ये शिवाचे अवतार, विष्णुचे दशावतार, चौसठ योगिनी आणि देवी सरस्वतीचे अवतार समाविष्ट असलेल्या प्रत्येकी १६ मूर्ती आहेत . पायऱ्यांची रुंदी १६ फूट आहे. वास्तुशास्त्रांनुसार गर्भगृह अष्टकोनी आकाराचे आहे. राम मंदिराच्या परिसरात सूर्य,गणेश,शिव,दुर्गा,विष्णू आणि ब्रह्मा यांना समर्पित मंदिरे आहेत. १५२८ मध्ये मुघल साम्राज्याचा सेनापती मीर बाकी याने बाबरच्या आदेशानुसार राम जन्मभूमीच्या जागेवर बाबरी मशीद मशीद बांधली. मशिदीचा सर्वात जुना रेकॉर्ड १७६७ मध्ये जेसुइट मिशनरी जोसेफ टिफेंथेलर यांनी लिहिलेल्या लॅटिन पुस्तक डिस्क्रिप्टिओ इंडियामध्ये सापडतो. त्यांच्या मते स्थानिक लोकांचा असा विश्वास होता की अयोध्येतील रामाचा किल्ला मानल्या जाणाऱ्या रामकोट मंदिर आणि रामाचे जन्मस्थान असलेल्या वेदीचा नाश करून मशीद बांधण्यात आली आहे. पाडलेल्या बाबरी मशिदीखाली गैर- इस्लामी रचना असल्याचे पुरावे म्हणून एएसआयच्या २००३ च्या अहवालाचा न्यायालयाने उल्लेख केला. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ऐतिहासिक निकालात असा निष्कर्ष काढला की मशिदीखालील रचना इस्लामिक नव्हती आणि असाही निष्कर्ष काढला की बाबरी मशिदीच्या बांधकामासाठी गैर-इस्लामी रचना पाडण्यात आली होती याचा कोणताही पुरावा सापडला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे रामाचे जन्मस्थान म्हणून वादग्रस्त संरचना असलेल्या हिंदूंच्या दाव्यावरील प्रश्न. न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की हिंदूंचा दावा 'निर्विवाद' आहे आणि असे मत मांडले की हिंदूंना ती जागा रामाचे जन्मस्थान मानण्याचे स्पष्ट पुरावे आहेत. असे घडले राममंदिर- •१५२६- मुघल शासक बाबर सर्वप्रथम भारतात आला. •१५२८ - ज्या ठिकाणी प्रभू रामांचा जन्म झाला त्याच ठिकाणी मीर बाकीने बाबरच्या सन्मानार्थ मशीद बांधली. या मशिदीला बाबरी मशीद असे नाव देण्यात आले •१८५३ - मुघल राजवट कमकुवत झाल्यानंतरच्या काळात प्रथमच रामजन्मभूमीचा मुद्दा उपस्थित झाला. या मुद्द्यावरून दोन समाजांमध्ये पहिल्यांदा संघर्ष निर्माण झाला व धार्मिक हिंसाचाराची पहिली घटना नोंदवण्यात आली. •१८५८ - अयोध्या संकुलातील हवन आणि पूजेबाबत प्रथमच एफआयआर दाखल करण्यात आला. ‘अयोध्या रिव्हिजिटेड’ या पुस्तकानुसार १ डिसेंबर १८५८ रोजी अवध पोलीस स्थानकाचे अधिकारी शीतल दुबे यांनी त्यांच्या अहवालात संबंधित परिसरात एक चौथरा बांधल्याचं नमूद केलं. वादग्रस्त बांधकामात प्रभू श्रीरामांशी निगडित चिन्हांचा पुरावा आहे याची पहिल्यांदा एखाद्या दस्तऐवजात नोंद करण्यात आली. यानंतर तिथे तारेचे कुंपण उभारण्यात आले आणि विवादित जमिनीच्या आतील आणि बाहेरील आवारात मुस्लिम आणि हिंदू समुदायाला स्वतंत्रपणे पूजा आणि प्रार्थना करण्याची परवानगी देण्यात आली. •१८८५ - इंग्रजांच्या काळात हे प्रकरण प्रथमच न्यायालयात पोहोचले. निर्मोही आखाड्याचे महंत रघुवर दास यांनी तत्कालीन फैजाबाद न्यायालयात बाबरी मशिदीला लागून असलेल्या राम मंदिराच्या बांधकामाला परवानगी देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत बाबरीच्या बांधकामाच्या बाहेरील प्रांगणात असलेल्या राम चौथऱ्यावर बांधलेल्या तात्पुरत्या मंदिराचं पक्कं बांधकाम करून त्यावर छप्पर घालण्याची मागणी करण्यात आली होती. हिंदूंना तेथे पूजा करण्याचा अधिकार आहे, परंतु जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांच्या निर्णयाविरुद्ध ते मंदिर पक्के करून छप्पर बनविण्यास परवानगी देऊ शकत नाही, असे न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात सांगितले. •२२ डिसेंबर १९४९ -स्वातंत्र्यानंतर मुख्य घुमटाखाली प्रभू श्रीरामाची मूर्ती आढळून आली. त्यानंतर हिंदूंनी तिथे नियमितपणे प्रभू श्रीरामाची पूजा करण्यास सुरुवात केली आणि मुस्लिमांनी तिथे नमाज अदा करणे बंद केले. नंतर सरकारने या जागेला कुलूप लावले. •१६ जानेवारी १९५० -यानंतर पहिल्यांदाच फैजाबाद येथील सिव्हिल न्यायालयात हिंदू महासभेचे सदस्य गोपाल सिंह विशारद यांनी या प्रकरणातील पहिला खटला दाखल केला. •५ डिसेंबर १९५० - अशीच मागणी करत महंत रामचंद्र परमहंस यांनी न्यायालयात दुसरा खटला दाखल केला. •३ मार्च १९५१-गोपाल सिंह विशारद प्रकरणात न्यायालयाने मुस्लिम पक्षाला पूजेत अडथळा आणू नये असे निर्देश दिले. असाच आदेश परमहंस यांनी दाखल केलेल्या खटल्यातही दिला होता. •१७ डिसेंबर १९५९-या जागेवर रामानंद पंथाच्या वतीने निर्मोही आखाड्यातील सहा जणांनी गुन्हा दाखल करून आपला दावा सादर केला. यामध्ये आधीचे प्रियदत्त राम यांना हटवून आपल्याला पूजा करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली. •१८ डिसेंबर १९६१-उत्तर प्रदेशच्या केंद्रीय सुन्नी वक्फ बोर्डाने या प्रकरणी वादग्रस्त जागेच्या मालकी हक्कासाठी खटला दाखल केला. •१९७८ मध्ये एएसआयने केलेल्या पुरातत्व उत्खननांच्या अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला होता की या जागेवर मंदिर अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडले आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञ केके मुहम्मद यांनी असा युक्तिवाद केला की १९७८ मध्ये एका हिंदू मंदिराचे अवशेष सापडले होते आणि त्यांनी अनेक इतिहासकारांवर वादावर तोडगा काढण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला. •१९८२- वादग्रस्त जागेचे कुलूप उघडण्याची मागणी करत विश्व हिंदू परिषदेने (VHP) विशाल मंदिर बांधण्यासाठी मोहीम सुरू केली. •८ एप्रिल १९८४ - अयोध्येतील श्री रामजन्मभूमीसाठी आणि तिथलं कुलूप उघडण्यासाठी दिल्लीतील साधू-संत आणि हिंदू नेत्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. •१ फेब्रुवारी १९८६ -फैजाबाद जिल्हा न्यायाधीशांनी हिंदूंना वादग्रस्त जागेवर पूजा करण्याची परवानगी दिली. यानंतर वादग्रस्त बांधकामाचे कुलूप पुन्हा उघडण्यात आले. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या मुस्लीम याचिकाकर्त्यांनी बाबरी मशीद कृती समिती स्थापन केली. •जानेवारी १९८९- प्रयागमधील कुंभमेळ्यादरम्यान मंदिराच्या उभारणीसाठी प्रत्येक गावात शिलापूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. •१ जुलै १९८९ -‘भगवान रामलला विराजमान’ या नावे या प्रकरणात पाचवा गुन्हा दाखल करण्यात आला. •९ नोव्हेंबर १९८९ -श्री रामजन्मभूमी स्थळी मंदिराच्या भूमीपूजनाची घोषणा करण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी भूमीपूजनासाठी परवानगी दिली होती. •६ डिसेंबर १९९२ -हजारो कारसेवक अयोध्येत पोहोचले. आंदोलक आयोजकांचे गर्दीवरील नियंत्रण सुटले. कारसेवकांनी बाबरी मशिदीचे बांधकाम पाडले. त्याच ठिकाणी त्याच दिवशी संध्याकाळी एक तात्पुरते राम मंदिर बांधून पूजा सुरू झाली. तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांनी कल्याण सिंह यांचे सरकार बरखास्त केले. •७ डिसेंबर १९९२ रोजी, द न्यू यॉर्क टाईम्सने वृत्त दिले की पाकिस्तानमधील ३० हून अधिक हिंदू मंदिरांवर हल्ला करण्यात आला, काहींना आग लावण्यात आली आणि एक पाडण्यात आले. बांगलादेशातील हिंदू मंदिरांवरही हल्ला करण्यात आला.•८ डिसेंबर १९९२ -संपूर्ण अयोध्येत संचारबंदी लागू करण्यात आली होती. देव भुकेला आहे, त्यामुळे प्रसादाची परवानगी दिली जावी अशी विनंती वकील हरिशंकर जैन यांनी उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठात केली. •१ जानेवारी १९९३ - न्यायाधीश हरिनाथ तिल्हारी यांनी रामाचे दर्शन आणि पूजेला परवानगी दिली. •७ जानेवारी १९९३ -केंद्र सरकारने येथे एकूण ६७ एकर जमीन संपादित केली, ज्यामध्ये वादग्रस्त संरचनेची जागा आणि कल्याण सिंह सरकारने न्यासाला दिलेली जमीन यांचा समावेश होता. •एप्रिल २००२- अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने वादग्रस्त जागेच्या मालकी हक्काबाबत सुनावणी सुरू केली. •5 मार्च २००३ -उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) संबंधित जागेवर उत्खनन करण्याचे निर्देश दिले. २२ ऑगस्ट २००३ रोजी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने न्यायालयात अहवाल सादर केला. संबंधित जागेच्या खाली एका मोठ्या हिंदू धार्मिक वास्तूचं (मंदिर) बांधकाम असल्याचे सांगण्यात आले. •५ जुलै २००५ रोजी, अयोध्येतील उद्ध्वस्त बाबरी मशिदीच्या जागेवरील तात्पुरत्या राम मंदिरावर पाच दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) सोबत झालेल्या चकमकीत हे पाचही जण ठार झाले, तर हल्लेखोरांनी वेढलेल्या भिंतीला तोडण्यासाठी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात एक नागरिक ठार झाला. CRPF चे तीन जवान जखमी झाले, त्यापैकी दोघे गंभीर जखमी झाले आणि त्यांना अनेक गोळ्या लागल्या. •३० सप्टेंबर २०१० - अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने या प्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागा सुन्नी वक्फ बोर्ड, निर्मोही आखाडा आणि राम लल्ला यांच्यात तीन समान भागांमध्ये विभागली गेली. न्यायाधीशांनी मध्यवर्ती घुमटाखाली जिथे मूर्ती होत्या, ती जागा जन्मस्थान मानली. •२१ मार्च २०१७ -रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादात सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला. सरन्यायाधीश जेएस खेहर यांनी दोन्ही पक्षांना सांगितले की जर ते सहमत असतील तर ते न्यायालयाबाहेर तोडगा काढण्यात मदत करण्यास तयार आहेत. •८ फेब्रुवारी २०१८ -राममंदिर-बाबरी मशिदीच्या वादग्रस्त जागेच्या दिवाणी अपिलावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. •२७ सप्टेंबर २०१८- सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यास नकार दिला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने तीन न्यायमूर्तींचे नवीन घटनापीठ स्थापन केले. •८ जानेवारी २0१९ -सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली पाच न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन केले. न्यायमूर्ती यू.यू. लळित, न्यायमूर्ती एस.ए बोबडे, न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा आणि न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड हे अन्य चार न्यायाधीश होते. •६ ऑगस्ट २०१९- सर्वोच्च न्यायालयात दररोज सुनावणी सुरू झाली. •१६ ऑक्टोबर २०१९-तब्बल ४० दिवस सलग सुनावणी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला. •९ नोव्हेंबर २0१९ -रामजन्मभूमीची संपूर्ण २.७७ एकर जमीन प्रभू श्रीरामाला देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचवेळी मुस्लिमांना मशीद बांधण्यासाठी एका चांगल्या ठिकाणी ५ एकर जमीन देण्याचे आदेश सरकारला देण्यात आले. •५ फेब्रुवारी २0२0 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत मंदिर उभारणीसाठी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची घोषणा केली. •५ ऑगस्ट २0२0- अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी येथे भव्य मंदिर उभारणीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. • जानेवारी २०२३ - नेपाळमधील गंडकी नदीतून २६ टन आणि १४ टन वजनाचे दोन ६० दशलक्ष वर्षे जुने शालिग्राम खडक पाठवण्यात आले. गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती कोरण्यासाठी या खडकांचा वापर करण्यात आला . •२२ जानेवारी २0२४- अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन आणि तेथे मूर्तींची प्राणप्रतिष्ठा.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

GALLERY

error: Content is protected !!